मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
इंग्रजीचे गुलाम!
काही वर्षांपूर्वी सोव्हियट यूनियनचे कॉन्सुलेट जनरल इगोर बोनी नागपूरला आले होते. तेव्हा येथील काही लोकांनी त्यांचे धनवटे रंगमंदिरात भव्य स्वागत केले. त्या सभेचे अध्यक्ष न्या० अभ्यंकर आणि स्वागताध्यक्ष होते कॉ० बर्धन! सत्कारमूर्तींच्या आधी ह्या दोघांची भाषणे इंग्रजीत झाली. पण त्यांचा अनुवाद करण्यात आला नाही. पुढे वाचा »
१. टपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला रु० ४०/- पाठवतील त्यांना अंक कुरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. पुढे वाचा »
मराठी भाषेत व मराठी भाषेबद्दल महत्त्वपूर्ण लेखन करणारे पुढील नामवंत साहित्यिक अलीकडेच कालवश झाले. पुढे वाचा »
कोल्हटकर अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. Kolhatkar.org हे स्वतःचे संकेतस्थळ. पुढे वाचा »
ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला. पुढे वाचा »
१ मे हा महाराष्ट्रदिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापनदिन. ह्या दोन्हीचे औचित्य साधून मराठी अभ्यास परिषदेने 'मराठी कवितेची बदलती भाषा' ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. पुढे वाचा »
'इसा' म्हणजे वीस वीस या संख्येचे गट (जोशी प्र०न० १९८२ : आदर्श मराठी शब्दकोश. विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे ६७). या शब्दाचे कृत्रिम संस्कृतीकरण म्हणजे 'विश्व'. 'गुंडम राउळ' यांना 'गोविंदप्रभू' किंवा 'अक्कलकोट' या गावाला 'प्रज्ञापूर' संबोधणे, अशापैकीच हा प्रकार. 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. पुढे वाचा »
शंका
कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत 'तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : "तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला..." ह्यात 'तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण 'सांज झाली’ असे म्हणतो; 'सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. 'तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; 'तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे महणत नाही. तरी 'तिन्ही सांजा’ या प्रयोगाला काही संदर्भ आहे का? पुढे वाचा »
प्रा० अर्जुनवाडकर ह्यांचा मुद्दा विचारणीय आहे. आपण उच्चार करताना बुङ्ढा, विट्ठल, सक्खा असाच करीत असतो. पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे; आपण नेहमी जसा उच्चार करतो तसे लिहीत नाही आणि आपण पूर्वीपासून जसे लिहीत आलो तसेच पुढेही लिहीत राहिल्याने आपले वाचन सुकर होत असते. पुढे वाचा »